नात्यांमध्ये वाद कसे मॅनेज करावे? | How to Manage Disputes in Relationship in Marathi

Rate this post

Relationship Tip in Marathi: जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वाद नाही घातला पाहिजे. आणि आपण तेच करतो. सहसा आपण भांडण नाही करत. पण आता मोठे झाल्यावर हे समजतं की न भांडणे हा नाती सुधारण्याचा मार्ग नाही. ते म्हणतात ना, घरात भांड्याला भांडं लागतं. म्हणजे वाद होणे साहजिक आहे. पण तुमचे आई बाबा असूदेत की बहीण भाऊ किंवा GF/BF. जर एखाद्या नात्यामध्ये प्रगती करायची असेल तर वाद होणारच. मग आता यावर नक्की उपाय काय आहे?

नवीन अपडेटसाठी फॉलो  करा  लिंक 
वाद कसे मॅनेज करायचे?

कोणताही वाद किंवा भांडण यशस्वीरित्या मॅनेज करण्याची गुरुकिल्ली म्हणजे भांडणावर असा तोडगा काढणे जिथे तुम्ही दोघं सहमत असाल. दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा हवा, तरच वाद झाला तरी त्यातून काहीतरी शिकून तुम्ही पुढे जाऊ शकता.

तुमच्या संवादाची पद्धत तपासा

मी एक प्रश्न विचारतो, याचं उत्तर अगदी प्रामाणिकपणे द्या! तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत किती वेळा भांडता? आणि भांडण झालं की कधी एकदा मी बोलतोय आणि माझे मुद्दे कधी मांडतोय, असं तुम्ही करता का?

म्हणजे तुमचा पार्टनर बडबड करत आहे, हवं ते बोलत आहे आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेत आहात. पण हे शांतपणे ऐकून घेणे तो काय बोलतोय हे समजून घेण्यासाठी नाही तर कधी एकदा तो शांत होतोय आणि मी बोलतोय यासाठी तर नसते ना, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात. मी सुद्धा असं केलं आहे. किंवा आपण सगळेच असं करतो.

आपण फक्त आपल्याला कधी बोलता येईल यासाठी वाट बघत असतो, यासाठी नाही की समोरचा व्यक्ती नक्की काय बोलतोय हे नीट समजून घेण्यासाठी.

ही पोस्ट वाचा   स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी हे काम करा
या स्वभावात बदल कसा करायचा?

हा स्वभाव जर बदलायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा मानसिकता (Mindset) बदलावा लागेल. जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत वाद घालाल तेव्हा असं समजा की हा वाद “आम्ही Vs प्रॉब्लेम” असा आहे.

“मी Vs तू” या मानसिकतेने जर तुम्ही वाद संपवण्याचा प्रयत्न केलात तर तो अजूनच वाढत जाईल. तुम्ही तुमचे मुद्दे मांडणार मग समोरचा व्यक्ती त्याचे. आणि हे असंच चालत राहणार जोपर्यंत नातं पूर्णपणे खराब होत नाही.

वादामध्ये प्रभावी संवाद कसा साधायचा?
  1. वादाचे मूळ कारण शोधा: वाद झाल्यावर पहिल्यांदा विचार करा की नक्की या वादाचं मूळ कारण काय आहे. भांडणाचं खरं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
  2. शांतपणे ऐका: समोरच्या व्यक्तीचं अगदी शांतपणे ऐका. फक्त तुम्हाला नंतर बोलायचं आहे म्हणून नाही, तर नक्की कुठे इश्यू होत आहे हे नीट समजून घेण्यासाठी.
  3. संयम ठेवा: भांडण झाल्यावर शांतपणे आणि संयमाने चर्चा करा. भावना व्यक्त करा पण आदराने.
  4. सहमत होण्याचा प्रयत्न करा: दोन्ही बाजूंनी सहमत होण्यासाठी प्रयत्न करा. समजूतदारपणा दाखवा आणि दोन्हींच्या दृष्टिकोनातून समस्या समजून घ्या.
निष्कर्ष | Conclusion

पुढच्या वेळी कोणाशीही भांडण झालं की सगळ्यात आधी विचार करा की नक्की भांडणाचं कारण काय आहे. समोरच्या व्यक्तीचं अगदी शांतपणे ऐका, फक्त तुम्हाला नंतर बोलायचं आहे म्हणून नाही तर नक्की कुठे इश्यू होत आहे हे नीट समजून घेण्यासाठी आणि मग बोला.

मी असं सांगत नाही की असं केल्याने वाद होणारच नाहीत. वाद हे तर चालूच राहणार, पण त्यांना कसं हॅण्डल करायचं यासाठी तुमचा मानसिकता योग्य असला पाहिजे. तरच वाद सहज मिटतील आणि परिणामी इतरांसोबत तुमची नाती सुधारतील.

तुम्हाला हे विचार आवडले असतील तर शेअर करा. तुमचे काही विचार असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा. वाचत रहा, शिकत रहा आणि तुमची नाती सुधारण्याचा प्रयत्न करा.

ही पोस्ट वाचा   लाईफचे 5 कटू सत्य, जाणून घ्या आनंदी राहाल

Leave a Comment